जीवनात एकदातरी महाराष्ट्रातील या 10 पर्यटनस्थळांना भेट द्यायलाच पाहिजे. महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांची माहिती बघण्या अगोदर आपन थोडक्यात महाराष्ट्राबद्दल माहिती घेऊ.. Best Tourist places in Maharashtra in Marathi …
महाराष्ट्राची माहिती | Maharashtra information in Marathi
महाराष्ट्र राज्य हे भारतातील एक प्रगत राज्य आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. देशाचे मोठ मोठे उद्योग मुंबई, पुणे, नागपुर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये स्थित आहे. यावरून आपल्या लक्षात येईल की देशाच्या आर्थिक प्रगतीमध्ये महाराष्ट्राचा सिहाचा वाटा आहे.
महाराष्ट्राचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशात तिसरा क्रमांक लागतो. एकून क्षेत्रफळ 3,07,713 चौ.कि.मी आहे. 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या 11 कोटी 24 लाख आहे. लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा देशात दुसरा क्रमांक लागतो.
महाराष्ट्राला 720 किलोमिटरचा समुद्र किनारा लाभला आहे. समुद्र किनाऱ्यावर वर येणाऱ्या पर्यटकांची संख्याही खुप आहे. त्यामुळे किनाऱ्या लगतच्या लोकांना रोजगार प्राप्त झाला आहे.
महाराष्ट्रातील ऐतिहासिक गड किल्ले, लेण्या, मुंबई शहर हे पर्यटकांचे विशेष आकर्षण आहे. आजही छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या गड किल्ल्यांना भेट दिल्यानंतर आम्हाला एक उर्जा प्राप्त होते.
हजारो वर्षांपूर्वी निर्माण केलेल्या लेण्या बघितल्या नंतर आम्हाला हजारो वर्ष जगल्या सारखा अनुभव येतो. यावरून पर्यटन स्थळांना भेटी देणे किती महत्वाचे आहे हे लक्षात येते.
बॉलिवूडची मायानगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या मुंबई येथे जग भरातून लोक आपले नशीब आजमावण्यासाठी येत असतात. जगातील मोठ मोठे उद्योगपती मुंबईतून उदयास आले आहे. चला तर मग जाणून घेऊया महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांबद्दल…अगदी सोप्या भाषेत… आपन सुरुवात आपल्या महाराष्ट्राची राजधानी व देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई पासून करणार आहोत..
महाराष्ट्रातील सर्वोत्तम पर्यटन स्थळे | Best Tourist places in Maharashtra in Marathi
मुंबई (Mumbai)
मुंबई शहर सात बेटांवर वसलेले शहर आहे. मुंबई आपल्या महाराष्ट्राची राजधानी आहे तसेच महाराष्ट्राचा सर्व राजकीय कारभार मुंबईमधून पाहिला जातो.
राज्यातील सर्व प्रशासकीय मुख्य कार्यालये व मोठ-मोठ्या उद्योगांचे मुख्य कार्यालये मुंबईमध्येच आहे. आपल्या देशाची आर्थिक राजधानी मुंबईच आहे. मुंबईमध्ये जगातील मोठ-मोठे उद्योग स्थित आहे. देशाला मनोरंजन पुरवणारी फिल्म इंडस्ट्री देखील इथेच आहे. मुंबईला मायानगरी म्हनूण ओळखलं जातं.
हे फक्त औद्योगिक व राजकीय शहर नसून एक मोठं पर्यटन केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. गेट वे ऑफ इंडिया, महालक्षमी रेसकोर्से, जुहू चौपाटी असे अनेक ठिकाणे पाहण्यासारखी आहे.
अजिंठा लेणी (Ajanta Caves)
अजिंठा लेणी जगप्रसिद्ध लेणी आहे. हजारो वर्ष जुन्या असलेल्या या लेणीला भेट देण्यासाठी देश-विदेशातून पर्यटक येत असतात.
अजिंठा लेणी महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असलेल्या सिल्लोड तालूक्यात छत्रपती संभाजीनगर-जळगाव महामार्गावर आहे. येथे जवळच वाघूर नदी आहे. येथील दगडामध्ये हजारो वर्षांपूर्वी केलेले कोरीव काम पाहिल्यानंतर इतिहासातील शिल्पकलेचा एक उत्तम नमूना मिळतो. Best Tourist places in Maharashtra in Marathi ..
इ.स पूर्व 2 व 3 शतकात अजिंठा लेणीचे निर्माण झालेल आहे. या लेणी मध्ये 29 बौद्ध लेणी पहायला मिळतात.
युनेस्कोने 1983 मध्ये अजिंठा लेणीला जागतिक वारसा म्हणून घोषीत केलेलं आहे. भारत सरकारच्या केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या प्रतिष्ठित पर्यटन स्थळांच्या 12 स्थळांमध्ये अजिंठा लेणीचा समावेश केलेला आहे. महाराष्ट्राच्या सात आश्चर्यांमध्ये अजिंठा लेणी हे प्रमुख आश्चर्य आहे. ही घोषणा जून 2013 मध्ये करण्यात आली होती.
अजिंठा लेणीचे भारतीय पर्यटकांसोबतच विदेशी पर्यटकांना देखील खुप आकर्षण आहे. अजिंठा लेणी प्राचीन काळात बनवली गेली असल्यामूळे त्या काळातील शिल्पकला बघण्याची पर्यटकांना ओढ लागलेली असते.
लोणार सरोवर (Lonar Sarovar
बुलढाणा जिल्ह्यात असलेल्या लोणार सरोवराची निर्मीती नैसर्गिक घटनेमूळे म्हणजेच उल्कापातामूळे झालेली आहे. खाऱ्या पाण्याचे सरोवर म्हणून लोणार सरोवर प्रसिद्ध आहे. येथे बेसाॅल्ट खडक आढळतो.
या सरोवराचे पाणी अल्कधर्मी असल्याचं पहायला मिळतं. लोणार सरोवराच्या आजूबाजूला असलेली मंदिरे खुप जूनी आहेत. जवळपास बाराशे वर्षांपूर्वीची ही मंदिरे आहेत. आत मध्ये असलेल्या मंदिरा जवळ उभे राहून देखील आपल्याला सरोवराचे नैसर्गिक स्वरूप पाहता येते. महाराष्ट्राच्या सात आश्चर्यांमध्ये लोणार सरोवर हे एक आहे.
लोणार सरोवर हे एक निसर्ग निर्मित पर्यटन स्थळ असल्यामूळे येथे निसर्ग प्रेमी व देश-विदेशातील पर्यटक आवर्जून भेट देत असतात. देश व विदेशातील अनेक संस्थांनी लोणार सरोवराचे संशोधन केले आहे.
कास पठार (Kas Pathar)
वेगवेगळ्या फूलांचा आनंद जर घ्यायचा असेल तर एक वेळेस सातारा जिल्हात असलेल्या कास पठाराला भेट द्यायलाच पाहिजेत. कास पठार विविध प्रकारच्या फुलांसाठी ओळखले जाते.
इथे फुले पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांना अजून एका ठिकाणाचे आकर्षन असते ते म्हणजे कास तलाव. कास पठारावर आल्यानंतर पर्यटक कास तलाव पाहण्यासाठी आवर्जून जात असतात. कास तलावाच्या बाजूलाच उंच डोंगराळ भाग आहे. त्या भागामध्ये मोठ मोठे फिक्या काळ्या रंगाचे दगड आढळतात. या दगडांवर उभे राहून निसर्गाचे सुंदर दृश्य पाहता येते.
पठारावर वेगवेगळ्या प्रकारचे फुले आहेत. सातारी वायतुरा, मंजिरी, कासा, तेरडा, कुमुदिनी, अंजन, सीतेची आसवे, सोनकी, हालुंदा, कंदील पुष्प, चवर आणि आभाळी अजून अनेक प्रकार आहेत. कास पठाराचा महाराष्ट्राच्या सात आश्चर्यांमध्ये समावेश केलेला आहे.
माथेरान (Matheran)
माथेरान भारतातील सर्वात लहान हिल स्टेशन म्हणून ओळखले जाते. रायगड जिल्ह्यात असलेल्या कर्जत तालुक्यातील हे ठिकाण पर्यटकांच आकर्षण बनलेलं आहे. माथेरान हे मुंबई आणि पुण्यापासून जवळपास 85 ते 110 किलोमीटर असल्यामूळे शहरातील लोक सुट्टीचा दिवस घालवण्यासाठी इथे येत असतात.
येथील शांत वातावरण प्रतेकाच्या मनाला भावत असते. माथेरानला एक नाही दोन नाही तब्बल 38 View Points आहेत. जेथून आपन येथील सौंदर्य बघू शकतो. येथील एक आश्चर्य म्हणजे इथे कोणत्याही वाहनांना आत मध्ये आणण्यास परवानगी नाही.
येथे भेट देण्यासाठी पावसाळा ऋतू चांगला आहे. कारण पावसाळ्याच्या दिवसात धुके, ढगे आणि ओले हवामान आपला आनंद दुप्पट करत असतात. म्हणून येथे पावसाळ्यात व्हिजीट करायला हवं..
लोणावळा (Lonavala)
लोणावळा हे एक पुणे जिल्ह्यातील व सह्याद्री पर्वत रांगेच्या कुशीत असलेलं पर्यटन स्थळ आहे. हे एक महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण आहे. हे ठिकाण महाराष्ट्रातचं नव्हे तर संपुर्ण भारतात थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. पुण्याहून लोणावळा 63 किलोमीटर इतके आहे. आणि मुंबईहून याचे अंतर 96 किलोमीटर आहे.
लोणावळा आल्यानंतर सर्वप्रथम येथील चिक्की तुम्ही खाल्ली असेलच. येथील चिक्की खुप प्रसिद्ध आहे. येथील निसर्गरम्य वातावरण आणि डोंगर दऱ्या आपले लक्ष वेधून घेतात. तुम्ही जर मुंबई किंवा पुणे येत असाल तर लोणावळा येथे नक्कीच भेट द्या..
खरं म्हणजे येथे येण्यासाठी रेल्वे व बस मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे कारण पुणे-मुंबई एक्सप्रेस हाईवे लोणावळ्यामधून जातो. त्यामूळे प्रवाशांना येथे येण्यासाठी अडथळा येत नाही.
रायगड किल्ला (Raigad Fort)
रायगड किल्ला ऐतिहासिक पर्यटन स्थळ आहे. (Historical tourist place in Maharashtra) आणि इतिहासातील एक महत्वाचा किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा 6 जून इ.स. 1674 मध्ये याच किल्ल्यावर झाला. अशी ही सोनेरी घटना या किल्ल्यावर घडल्यामूळे या किल्ल्याचे महत्व काही वेगळेच आहे.
रायगड चढायला खुप अवघड असल्यामूळे शत्रूला रायगडावर हल्ला करणे कठीण होते. रायगडाची राजधानी म्हणून शिवजी महाराजांनी निवड केली होती. महाराष्ट्राच्या सात आश्चर्यांमध्ये रायगडाची निवड करण्यात आलेली आहे.
गडावर जाण्यासाठी अंदाजे 1475 पायऱ्या चढाव्या लागतात. रायगडावर आल्यानंतर इथे अजून अनेक ठिकाणे पाहण्यासारखी आहे – जिजाऊंची समाधी, जिजाऊंचा वाडा, वाघ बीळ, नाने दरवाजा, वाळुसरे खिंड, चित्त दरवाजा, गंगासागर तलाव, हत्ती तलाव, शिरकाईदेवी मंदिर, जगदीश्वर मंदिर, महा दरवाजा असे अजून बरेच ठिकाणं आहेत की ज्यांना तुम्ही रायगडावर गेल्यानंतर पाहू शकता..
रायगडला येण्यासाठी तुम्ही बसने येऊ शकता. महाडवरून बस उपलब्ध आहे. तसेच तुम्ही प्राइवेट गाड्या देखील इथे आणू शकता.
दिवे आगर (Dive Agar)
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात असलेले दिवे आगर हे एक प्रसिद्ध बीच आणि गाव आहे. दिवे आगर हा बीच 5 ते 6 किलोमीटर येवढ्या अंतरावर पसरलेला आहे. समुद्र किनाऱ्यावरील सुंदर अशा लाठा आणि स्वच्छ किनारा पाहिल्यानंतर तुम्ही इथे परत-परत भेट द्याल.
येथील नागरिक व ग्रामपंचायतने गावात शांतता आणि किनाऱ्याची स्वछता ठेवण्यासाठी सुचना फलक लावले आहेत. त्यामूळे हे दिवे आगार गाव अतिशय स्वच्छ, सुंदर आणि शांत वातावरणाचे आहे. येथे येणाऱ्या प्रतेक पर्यटकाचे येथे मनरमल्याशिवाय राहत नाही.
छोटं टुमदार असलेल्या दिवे आगार गावातील गल्ल्यांमध्ये गेल्यानंतर रस्त्याच्या दोनही बाजूला झाडे लावलेली दिसतात. कवलारु घरे आणि घरा समोर लावलेली झाडे आपलं लक्ष वेधून घेतात.
इथे एक प्रसिद्ध सुवर्ण गणेश मंदिर आहे. इथे 1997 मध्ये सोन्याच्या गणपतीची मुर्ती सापडली होती. तेव्हा पासून हे दिवे आगार गाव पर्यटन ठिकाण म्हणून प्रसिद्ध झाले.
दापोली (Dapoli)
दापोली तालुका असलेले रत्नागिरी जिल्ह्यातील एक छोटे शहर आहे. महाराष्ट्रातील तसेच देशातील पर्यटकांचे विशेष आकर्षण बनत असलेले पर्यटन केंद्र म्हणजे दापोली. इथे असलेले नयनरम्य समुद्र किनारे (बीच) दापोलीला येण्याची ओढ लावतात. दापोलीला मिनी महाबळेश्वर म्हटलं जातं कारण येथील वातावरण नेहमी आल्हाददायक असते.
दापोलीतील हर्णे बंदर हे खुप मोठे मच्छी मार्केट आहे. इथे वेगवेगळ्या प्रकारचे मासे मिळतात. हे एक व्होलसेल मच्छी मार्केट आहे. इथे माशांचा लिलाव केला जातो.
खरं म्हणजे दापोलीचे समुद्र किनारे खुपच सुंदर आणि स्वच्छ आहे. येथील समुद्र किनाऱ्यांचा जर आनंद घ्यायचा असेल तर हर्णे, बुरोंडी, मुरुड, दाभोळ या किनर्यांवर गेलच पाहिजे.
या किनाऱ्यां व्यतिरिक्त दापोलीला ऐतिहासिक महत्व देखील आहे. येथील ऐतिहासिक सुवर्णदुर्ग किल्ला, कनकदुर्ग किल्ला, फतेदुर्ग किल्ला, गोवा किल्ला, पर्णालक दुर्ग हे सर्व किल्ले इतिहसाची साक्ष देतात.
तुम्ही जर मुंबईहून दापोलीला येणार असाल तर मुंबईहून दापोलीचे अंतर 215 किलोमीटर इतके आहे. दापोलीला येण्यासाठी आपली लाल परी (बस) उपलब्ध आहे.
अलिबाग (Alibag)
अलिबाग रायगड जिल्ह्यातील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ. याला महाराष्ट्राचा गोवा देखील म्हटलं जातं. इथे असलेले सुंदर, स्वच्छ आणि नयनरम्य समुद्र किनारे पाहण्यासाठी संपुर्ण महाराष्ट्रातून व देशातून पर्यटक इथे येत असतात.
अलिबाग हे नाव एका अली नावाच्या व्यक्तीमुळे पडले आहे. या व्यक्तीकडे खुप साऱ्या बागा होत्या म्हणून या शहराचे अलिबाग नाव रुजू झाले.
येथील मांडवा बीच हा अलिबाग मधील सुंदर, स्वच्छ आणि प्रदूषण मुक्त असलेला कौटुंबिक बीच आहे. अलिबाग मध्ये सर्वात जास्त पर्यटकांची गर्दी याच बीच वर पहायला मिळते. या बीच वर खुप उंच असलेले नारळाचे झाडे आहेत. यामूळे हा बीच अधिकच सुंदर दिसतो. येथील अजून मुरुड बीच, नागाव बीच, अलिबाग बीच, वरसोली बीच, किहीम बीच, काशीद बीच आणि अक्षय बीच हे देखील पर्यटकांच्या पसंतीचे ठरले आहे.
खांदेरी किल्ला किल्ला अलिबाग शरापासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर आहे. हे अलिबाग मधील महत्वाचे पर्यटन स्थळ आहे. अलिबाग मधील ब्रम्हकुंड, कनकेश्वर वन हे प्रसिद्ध ठिकाणे पाहण्यासाठी पर्यटक आवर्जून जात असतात.
अलिबाग मुंबईपासून अंदाजे 95 किलोमीटर इतके आहे तर पुण्याहून अलिबाग 145 किलोमीटर आहे. इथे येण्यासाठी लाल परी बस उपलब्ध आहे.
मित्रांनो, या लेखात आपन महाराष्ट्रातील 10 पर्यटकांचे आवडते पर्यटन स्थळे बघीतली आहे. ही पर्यटन स्थळे अशी आहेत की एकदा तरी या पर्यटनस्थळांना भेट द्यायलाच पाहिजे